मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईत आज शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. यावेळी सत्तेचे समाना वाटप व्हावे या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचे दिसते आहे. राज्यातील घडामोडींना आज वेग आहे कारण उद्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपत आहे. यावेळी शिवसेनेच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेने, लोकसभेला जो फॉर्म्युला निश्चित झाला आहे त्यानुसार सर्व काही व्हावे अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली की जे ठरलं आहे ते व्हावं. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो आम्हा सर्वांना मान्य आहे. लोकसभेचा जो फॉर्म्युला ठरला होता तसेच व्हावं.
एकीकडे शिवसेना आमदारांची बैठक सुरु असताना मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, अशिष शेलार हे राज्यपालांची भेट घेणार होते. परंतू त्या आधी हे तिघे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहचले. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेवर काय होणार आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेच्या आमदारांना मुंबई न सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमदारांनी प्रतिक्रिया दिली हे की शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच. या दोन्ही घटनामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच वाढणार की सुटणार यावर प्रश्नच चिन्ह उपस्थित झाले आहे.
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी बैठक पार पडल्यावर दावा केला की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच आणि उद्धव ठाकरेंचा निर्णय अंतिम असेल. राज्यात विधानसभेचा निकालाला 2 आठवडे होऊन गेले आहेत. परंतू सत्ता स्थापनेचा पेच अजून तसाच आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून आहे. परंतू आता राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी सत्ता कोणाची आणि कोण मुख्यमंत्री यावर संभ्रम आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील दोनदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीत काँग्रेसचे चाणाक्य अहमद पटेल आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट झाली. त्यामुळे पुढे काय होणार यावर अजून स्पष्टता नाही.
Visit : bahujannama.com