नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा अद्यापही दिला गेला नसल्याने त्याची दखल न्यायालयाने घ्यावी असे याचिकेत म्हटले होते.
याप्रकऱणी वकिल अश्वीनी उपाध्याय यांनी याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीवेळी याचिकर्त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
सर्व शाळांमध्ये वंदे मातरम राष्ट्रगीताप्रमाणे गायले गेले पाहिजे. तसेच एक नॅशनल पॉलिसीदेखील यासाठी तयार करण्यात यावी अशी मागणी उपाध्याय यांनी केली होती.
वंदे मातरमला काही संघटनांनी विरोध केला आहे. यापुर्वी २०१७ मध्ये वंदे मात्र अनिवार्य करता येत नाही असं त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला.