नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूकांची तारीख जाहीर झाल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांकडून कामाच्या आधारावर मत मागितलं आहे. राजधानी दिल्लीत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आम्ही काम केले असेल तर आम्हाला मत द्या, नसेल केले तर मत देऊ नका, असे केजरीवाल म्हणाले.
मी दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. सगळेजण चांगल्या शाळेत शिकत आहेत. आम्ही जेव्हा पाणी दिले तेव्हा हा विचार नाही केला की, कोणाच्या घरी पाणी पोहोचवत आहोत. आम्ही भाजपच्या घरी जाऊन सांगू की, ७० वर्षात पहिल्यांदा पाणी पोहोचवले आहे, असे केजरीवाल म्हणाले. पुढे केजरीवाल म्हणाले की, सरकार बदलले तर तुमची शाळा आणि रुग्णालये खराब होतील. यावेळी तुम्ही कामाच्या आधारावर मतदान करा.
घाणेरडे राजकारण करू नये, असे म्हणत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीतील एका कार्यक्रमाला शहा आले असताना त्यांनी दिल्लीच्या विकासाबद्दल बोलणे अपेक्षित होते. परंतु शहांनी त्यावर भाषण केले नाही. त्यावेळी शहा असे म्हणाले की, त्यांच्या गैरवर्तनांला आम्ही प्रतिसाद देणार नाही. ते असेही म्हणाले की, आमच्याकडे दिल्लीसाठी चांगले व्हिजन असून ते आपल्या जाहीरनाम्यात देऊन पूर्ण करू, असे केजरीवाल सांगितले.
मागील निवडणुकीत दिल्लीतील लोकांनी विक्रम केल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी २०२० ची विधानसभा निवडणुक ही रस्ते, पाणी आणि कच्च्या वसाहती या मुद्द्यांवर लढवणार असल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, “ज्या विकासाच्या गाडीला गंज लागला होता. दिल्लीतील लोक एक्सीलेटर दाबतील.”
भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या शिक्षण, रस्ते आणि पाणी या कामांमध्ये कोणतीही कमी काढली नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. पुढे केजरीवाल म्हणाले की, भारताच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होईल की लोकं कामाची तुलना करतील. यादरम्यान ते असेही म्हणाले की दिलीत दोन सरकारे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील डीडीए, पोलीस आणि दिल्ली महानगरपालिका भाजपाकडे आहेत. दिल्ली सरकारकडे शिक्षण आणि आरोग्य आहे. दिल्लीतील लोकांना दिल्लीला एमसीडी बनवायचे आहे, असे केजरीवाल म्हणाले.