नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना पुन्हा एकदा स्फोटक रूप घेऊ लागला आहे. देशात मागील 24 तासात सापडलेल्या 60 हजारपेक्षा जास्त नव्या प्रकरणांवरून धोकादायक स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशात मागील 24 तासात कोविड-19ची 62,258 नवी प्रकरणे समोर आली आहेत तर 291 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवी प्रकरणे समोर आल्यानंतर देशात एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 1 कोटी 19 लाख 8 हजार 910 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 95 हजार 23 लोक रिकव्हर झाले आहेत, तर यावेळी 4 लाख 52 हजार 647 अॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर देशात मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 61 हजार 240 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासांच्या आत 11,64,915 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
महाराष्ट्रात भितीदायक स्थिती, 36,902 नव्या केस
महाराष्ट्रात लागोपाठ वाढणारा कोरोनाचा वेग आता भितीदायक वाटू लागला आहे. दररोज विक्रमी स्तरावर प्रकरणे समोर येत आहेत. संसर्गाची स्थिती पहाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 28 मार्चपासून नाईट कर्फ्यू घोषित केला आहे. राज्यात मागील 24 तासात 36,902 नव्या केस सापडल्या आहेत. या दरम्यान 112 रूग्णांचा मृत्यू झाला. तर 17,019 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले. महाराष्ट्रात कोरोनाची एकुण 26,37,735 प्रकरणे झाली आहेत. सध्या 2,82,451 अॅक्टिव्ह केस आहेत. तर एकुण 53,907 रूग्णांनी आतापर्यंत जीव गमावला आहे.
* दिल्ली सलग दुसर्या दिवशी 1,534 नवीन केस
* कर्नाटकात 24 तासात 2,566 नवीन केस, 13 मृत्यू.