नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील 59 अॅप्सवर बंदी आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर चिनी अॅप्स यांनी कोर्टात धाव घेतली आहे. मात्र या प्रकरणात देशाविरोधात याचिका दाखल झाल्यास बाजू मांडणार नाही, असे वक्तव्य देशाचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केले आहे. टिकटॉकची बाजू मांडण्यासाठी त्यांनी नकार दिला आहे.
केंद्र सरकारने बंदीचा आदेश काढल्यानंतर टिकटॉक, हॅलोसह चीनचे 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. वापरकर्त्यांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत हे अॅप्स बंद करण्यात आले आहे. बंदीच्या निर्णयानंतर टिकटॉकने याबाबत स्पष्टीकरण दिले असून यामध्ये वापरकर्त्यांचा डेटा चीनला दिला जात नसल्याचे सांगितले आहे. टिकटॉकचे भारताचे प्रमुख निखिल गांधी यांनी यावर स्वाक्षरी केली आहे.
टिकटॉकवरील बंदीनंतर अनेक तरुणांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात नापसंती व्यक्त केली होती. भारत-चीन सीमा विवादादरम्यान भारत सरकारने डेटा सुरक्षेचा हवाला देत चीनला मोठा धक्का दिला आहे आणि 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक, स्नॅपचॅट आणि हॅलो यासारख्या अनेक प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे.