नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप सतत वाढत आहे. कोरोना रूग्णांची संख्या 26 लाखांच्या पुढे गेली आहे, तर 50 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्यांची संख्या 19 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे 944 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 50,951 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या एकुण केस 26,42,344 झाल्या आहेत. एक दिवसात 63 हजारपेक्षा जास्त नव्या केस आल्या. देशात आता कोरोनाच्या अॅक्टीव्ह केस सुमारे 7 लाख आहेत. परंतु, रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा होत आहे. आतापर्यंत 19,09,541 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यांमध्ये सातत्याने कोरोनाच्या केस वाढत आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाच्या 11 हजारपेक्षा जास्त केस समोर आल्या आहेत. अशाच प्रकारे दिल्लीत 24 तासात 1200पेक्षा जास्त नवीन प्रकरणे आली आहेत. आतापर्यंत येथे 1.51 लाख रूग्ण झाले आहेत. दिल्लीत कोरोना व्हायरस संक्रमणातून बरे होण्याचा दर रविवारी 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. मध्य प्रदेशात 24 तासात कोरोनाच्या एक हजारपेक्षा जास्त केस आल्या आहेत. राजस्थानमध्ये 24 तासात कोरोनाच्या विक्रमी 1300 केस आल्या आहेत.
गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोना रूग्णांची एकुण संख्या 78,783 झाली आहे, तर बरे झालेल्या रूग्णांची एकुण संख्या 61,496 झाली आहे. महाराष्ट्रात एकुण कोरोना रूग्णांची संख्या 5,95,865 झाली असून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 4,17,123 झाली आहे.