कैथवलिया :वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन वाढवण्यातआल्यामुळे मजुरांनी पुन्हा मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक विखरलेल्या व्यक्ती कुटुंबात परत आल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील कैथवलिया इथे घडला आहे. 18 वर्षांपूर्वी रागाने घर सोडलेले महंगी प्रसाद लॉकडाऊनमुळे पुन्हा गावी परतले. घरी परतल्यानंतर त्यांना आई आणि पत्नी दोघीही भेटल्या नाहीत. त्यांची मुलगी घरी दिसल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
तारकुलवा पोलिस स्थानक क्षेत्रातील कैथवलिया गावचा रहिवासी महंगी प्रसाद 18 वर्षांपूर्वी पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून घर सोडून गेला होता. त्यावेळी ते अंदाजे 40 वर्षांचे होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगीही होती. लॉकडाउनमुळे 18 वर्षांनंतर ते गावात परतले होते. मात्रा, गावी गेल्यानंतर त्यांना आई, पत्नी दिसली नाही. गेल्या 18 वर्षांमध्ये गाव आणि घराची आठवण नाही आली. गावातील लोकांनी महंगी यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काहीच थांगपत्ता लागत नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजून घरच्यांनी दिवस ढकलायला सुरुवात केली. त्यांची घरी परत येण्याची अपेक्षाही कुटुंबीयांनी सोडून दिली.
कोरोनामुळे मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर काही दिवस तहान भूक विसरून गुजराण केली पण मग घरची आठवण येऊ लागली म्हणून गावी जाण्याचा निश्चय केला. साडेतीन हजार रुपयांचे भाडें देऊन महंगी प्रसाद अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे पोहोचले. तिथून त्यांनी घरापर्यंत पायी प्रवास केला. पत्नी आणि आईच्या मृत्यूनंतर त्यांनी मुली आणि जावयासोबत उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे.