नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमधील मृतांचा आकडा वाढून १७७० वर पोहोचला असल्याचे चीन सरकारने सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मागील वर्षी या रोगाचा प्रादुर्भाव आणि त्याला जबाबदार असलेल्या कोरोना व्हायरसमुळे कोविड -१९ असे नाव दिले होते. तर राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार या विषाणूची लागण झालेल्या २०४८ नवीन रुग्णांच्या पुष्टीनंतर देशभर संक्रमित लोकांची संख्या ७०५४८ वर गेली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार चीनमध्ये झालेल्या प्राणघातक कोरोना विषाणूमुळे हुबेई प्रातांत आणखी १०५ जणांना मारले गेल्यामुळे सोमवारी हा आकडा १७७० वर गेला आहे.
चीनच्या वुहानमधून भारत तिबेट सीमा पोलिस यांच्या छावला येथे असलेल्या केंद्रात ४०६ लोकांमध्ये कोरोना विषाणू आढळलेला नसून या लोकांचा नमुन्यांचा निकाल नकारात्मक आला आहे. तसेच आता या लोकांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याचे काम आजपासून सुरू होणार असून शुक्रवारी हे नमुने सादर करण्यात आले होते. वुहानमधून बाहेर काढल्यानंतर या लोकांना तिबेटमधील केंद्रात आणि सैन्याच्या मानेसर केंद्रात ठेवण्यात आले असताना दुसरीकडे केरळमध्ये आणखी एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून आता फक्त एका रुग्णावर उपचार सुरू आहे.
केरळमधील कोरोना विषाणूच्या तीन घटनांपैकी कासारगोड येथील कंजांगड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दुसऱ्या रुग्णालाही डिस्चार्ज दिला असून यापूर्वीही एक रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेला आहे. कोरोनो व्हायरसचे वारंवार नकारात्मक परिणाम दर्शविणार्या रूग्णांची घरीच देखरेख केली जाईल. देशात आता कोरोना आजाराने ग्रस्त फक्त एक व्यक्ती असून थ्रीसुर मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरु असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी सांगितले.
जपानमध्ये कार्यरत भारतीय दूतावासाने सांगितले की, भारत याकोहामा किनार्यावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजातील प्रत्येक भारतीयाला सुरक्षित घरी आणण्यास मदत करणार आहे. कोरोनाची शेवटची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल. या जहाजावर एकुण ३७११ प्रवाशी असून त्यामध्ये १३८ भारतीय आहेत. यातील कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या ३५५ झाली आहे. नेपाळने देखील चीनमधील आपल्या १७५ नागरिकांना बाहेर काढले आहे. यामध्ये १३४ पुरुष आणि ४१ महिला आहेत. हे लोक सकाळी चार वाजाता येथील विमानतळावर पोहचले. यामध्ये १७० विद्यार्थी आहेत जे वुहानमध्ये शिकत आहेत. या सर्वांना १४ ते १७ दिवसांपर्यंत खरिपाटी सेंटरमध्ये देखरेखीखाली वेगळे ठेवण्यात आले आहे.