बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढीबरोबरच मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी राज्यात उच्चांकी 14492 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आज दुसऱ्या दिवशी देखील 14 हजारांच्या पुढे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात 14161 नवी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच दरम्यान 399 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 57 हजार 450 इतकी झाली असून राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.82 टक्के इतके आहे.
14,161 new #COVID19 cases, 11,749 recoveries & 339 deaths reported in Maharashtra today. Total number of COVID cases rises to 6,57,450 in the state, which includes 4,70,873 recovered cases, 1,64,562 active cases & 21,698 deaths till date: State Health Department, Maharashtra pic.twitter.com/CM2nnfENrJ
— ANI (@ANI) August 21, 2020
एकीकडे कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 399 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 21 हजार 698 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.30 टक्के इतके आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 11 हजार 749 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 4 लाख 70 हजार 873 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.62 टक्के इतके आहे. सध्या राज्यामध्ये 1 लाख 64 हजार 562 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरु आहेत. राज्यात 11 लाख 92 हजार 685 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 35 हजार 132 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आतापर्यंत राज्यात 34 लाख 92 हजार 966 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत.