नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेस अध्यक्षपदावर या आठवड्यात नव्या व्यक्तीची निवड होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्तच होते. राहूल गांधी परदेशात गेल्याने नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रीया थांबली होती. मात्र ते नुकतेच परदेशातून परतले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होऊन पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड होइल असे काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येते आहे.
लोकसभेमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. या पराभवामुळे व्यथित झालेल्या राहुल गांधी यांनी राजीनाम दिला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना राजीनाम मागे घेण्याबाबद विनंती करण्यात येत होती. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. तसेच काँग्रेस कार्यकारिणीला नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सुचना देखील त्यांनी केली होती. त्यानंतर अनेक जणांची नावे अध्यक्षपदासाठी पुढे आली. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सुशीलकुमार शिंदे यांची नावे आघाडीवर होती. मात्र नवीन अध्यक्ष हा तरुण असावा अशी मागणी कार्यकर्त्यांमध्ये होत होती.त्यामुळे आता राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, मध्य प्रदेशचे उप मुख्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची नावे चर्चेत आहेत. काही काळापुर्वी प्रियांका गांधी यांचे नाव देखील चर्चेत होते. मात्र राहुल गांधी यांनी गांधी परिवारातील व्यक्त अध्यक्ष होणार नसल्याचे सांगितल्याने प्रियांका यांचे नाव मागे पडले.
दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी काही नावांवर चर्चा झाली आहे. अंतिम निर्णय कार्यकारिणीचे सदस्य घेतील. मात्र, पक्षाकडून संभाव्य उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात येईल, त्यानंतर कार्यकारिणीकडून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे नाव न छापण्याच्या अटीवर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने माध्यमांना सांगितले आहे.