मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यावरुन राष्ट्रवादी व भाजपनेत्यांमध्ये शाब्दीक चकमकी होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम भाजपानं केलंय दुसरा पक्ष फोडून आपला पक्ष वाढविणे ही संस्कृती नव्यानं भाजपाने आणली आहे. जनता त्यांना नक्कीच धडा शिकवले.
तत्पुर्वी राष्ट्रवादीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पवार म्हणाले, सत्तेच्या जोरावर भाजपा ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत आहे. अनेकांना ईडीची व सीबीआयची भीती दाखवली जाते आहे. कोल्हापूरमधील नेत्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने नकार दिल्यास त्यांच्यावर आयकर विभागने धाडी टाकल्या. मी सहा आमदारांपासून 60 आमदारांपर्यंत पक्ष वाढवला आहे. त्यामुळे भाजपच्या या खेळीला देखील चोख प्रत्युउत्तर देण्यात येईल. चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या असून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नसल्याचंही पवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान जयंत पाटील यांनी राजेश टोपे हे राष्ट्रवादी सोडून जाणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्थ नसल्याचे सांगितले आहे. केवळ काहीजण दबावाला बळी पडून पक्षत्याग करत आहेत. आमच्या ही संपर्कात भाजपमधील नेते मंडळी आहेत. योग्य वेळ येताच त्यांना देखील आम्हीआमच्या पक्षात प्रवेश देऊ असे पाटील यांनी सांगितले.