सांगली : बहुजननामा ऑनलाईन – विश्वजित कदम यांनी काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एका जागेवर विजय मिळवून दिला आहे. त्यांना पळूस कडेगाव (सांगली) इथून उमेदवारी दिली होती. या मतदार संघात त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय विभुते यांना उमेदवारी दिली होती. परंतु, विश्वजित कदम यांनी आपली बाजी मारली आहे. विश्वजीत कदम यांना १ लाख ५६ हजार ४४ इतकी मते होती, तर शिवसेनेचे संजय विभुते यांना १२ वाजता फक्त ५०४७ मतं होती. त्यामुळे विश्वजीत कदम यांनी ही निवडणूक एकतर्फी विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.
परंतु, या ठिकाणी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे आणि काँग्रेसने महाराष्ट्रात हा मोठा विजय मिळवला आहे. विश्वजीत कदम यांनी पळूस कडेगाव मध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. शिवसेनेचा पत्ता पळूस कडेगाव मतदार संघात न चालल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे विश्वजीत कदम पहिल्यापासूनच आघाडीवर होते. या कारणाने विश्वजीत कदम यांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली होती.
Visit : bahujannama.com