पेठ : बहुजननामा ऑनलाईन – शाळा विकास निधीच्या नावाखाली आदिवासी मुलांकडून प्रवेशाच्या वेळी पैसे घेतले जात असल्याची तक्रार करण्यात आली यासंदर्भात विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाबत पंचायत समिती सभागृहात माध्यमिक व शासकीय आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील १ ली ते बारावी पर्यंत एकही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही.
याची दक्षता शिक्षण विभागासह संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी घ्यावी असे आवाहन यावेळी सभापती पुष्पा गवळी यांनी केले. वर्गनिहाय रिक्त जागांचा आढावा घेऊन ज्या विद्यार्थ्यांना अजून प्रवेश मिळाला नाही त्यांना सामावून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच संबंधित शाळांची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे .
शाळेतील विद्यार्थाना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यांना निवासी शाळांमध्ये चांगले जेवण दिले जाते का ? परंतु निकृष्ट प्रकारचे भोजन दिले जाते. वस्तीगृहातील अस्वच्छता यावर बैठकीत तक्रारी कार्यात आल्या.
यावेळी उपसभापती तुळशीराम वाघमारे , विलास अलबाड ,शाम गावित ,नंदू गवळी ,सुरेश पवार ,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसाळे ,अँटी भुसावरे ,गटशिक्षणाधिकारी संतोष झोले,यांच्यसह विस्तार अधिकारी माध्यमिक शासकीय आश्रम शाळा मुख्याध्यपकही उपस्थित होते.