बहुजननामा ऑनलाइन टीम : नागपुरमध्ये अधिवेशना दरम्यान झआलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकात्मक भाष्य केले. ते म्हणाले की, ‘सामना हे वृत्तपत्र कधीही वाचत नाही असं सागणाऱ्यांनी आज सभागृहात सामना दाखवला. याचाच अर्थ सामना हे सामान्य माणसाचं शस्त्र आहे. हे सिद्ध झाले आहे. सामना तेव्हाच वाचला असता तर आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती. विरोधकांना शिमगा करायचाच असेल तर केंद्र सरकारच्या नावाने करावा राज्य सरकारच्या नावाने करु नये.’
उद्धव ठाकरे म्हणाले की, सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालू नये. विरोधकांनी आज घातलेला गोंधळ हा निंदनीय आहे. तुम्ही बोंबलून काहीही होणार नाही. बोंबलून प्रश्न मांडल्याने तुमचेच बिंग फुटते आहे असाही टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. पुढे ठाकरे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांना दिलेलं वचन हे त्यांच्या आणि माझ्यामधलं वचन आहे. शिवरायांच्या आशीर्वादाने मी ते वचन पाळणार आहे. तुम्ही आम्हाला करायला लावलं हे कोणालाही भासवू नये.’
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदारांना संबोधित केले. ‘समोरचे लोक आपल्याला पावलोपावली अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. पावलावर पाऊल टाकण्याऐवती पायात पाय अडकवण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे सावध रहायला हवं.’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
Visit : bahujannama.com