बहुजननामा ऑनलाइन टीम : भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावरुन मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची निर्मितीचा उद्देश आहे. पण सध्या काम आणि फक्त चर्चा सुरु आहेत. मेक इन इंडियाचा उद्देश खूप चांगला आहे. पण प्रत्यक्षात काम खूप धीम्या गतीने सुरु आहे, असे भदौरिया म्हणाले. अजेंडा आज तक कार्यक्रमात ते बोलत होते.
मेक इन इंडियामध्ये सहभागी असलेल्या सर्व भागीदारांनी एका उद्दिष्टाने काम सुरु केले तर स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो, असे भदौरिया म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही आमचा पाठिंबा दिला आहे. डिआरडिओने वेळेत डिझाईन्स बनवल्या पाहिजे. शस्त्रास्त्र सरकारी कंपन्यांनी निर्मिती मुल्य राखले पाहिजे. खासगी क्षेत्राला प्रोत्साहान दिले पाहिजे.’ एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया पुढे म्हणाले की, आगामी 10 वर्षात ज्या काही योजना आहेत, त्या लवकरच पूर्ण करण्याचे लक्ष आहे. त्यानुसार 40 एलसीए ऑर्डर करत आहोत. त्यात अजून 83 एलसीए ऑर्डर देण्यात येईल. त्यामुळे वायुदलातील लढाऊ विमानांची संख्या वेगाने वाढेल.
यानंतर, एलसीएचे मार्क-2 विमान देखील आणले जाईल. त्या संदर्भातील कामही सुरू झाले असून त्यासाठी डीआरडीओ मदत करत आहे. मात्र पुढील 6 ते 8 वर्षात रडार सिस्टिम देखील पूर्णपणे स्वदेशी असतील, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. राफेल म्हणाले की, स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी ही योग्य वेळ आहे. राफेल आणि एस-400 च्या खरेदीने हवाई दलाची तात्काळ निकड पूर्ण होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एअर फोर्स प्रमुखांनी फायटर विमानांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या भारतीय कंपन्यांना स्टेल्थ टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक सेन्सर्स, दीर्घ पल्ल्याची अस्त्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
Visit : bahujannama.com