जयपुर ( बहुजननामा ऑनलाइन) – राजस्थानच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जय श्री रामचा नारा दिला. एका विधेयक पास झाल्यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेले अशोक गेहलोत म्हणाले की, ”पाऊस चांगला झाला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंद करतो, कारण दुष्काळाची चिंता सतावत असताना हा पाऊस झाला आहे. ” विरोधकांकडे पाहत उपाहासात्मक शैलीत गेहलोत म्हणाले ”याबद्दल मी इंद्रदेवांची कृपा झाली असे म्हणून शकतो का ? कारण त्यांच्यावर अजून कब्जा नाही…जय श्री राम” यानंतर विरोधकांचा समाचार घेताना गेहलोत म्हणाले ”जय श्री रामवर तुम्ही कब्जा केला आहे. पण जेंव्हा मी जय श्री राम बोललो तर आमचे लोक पण खुश झाले नाहीत का? पण हे दुर्देवी आहे की तुम्ही लोक कब्जा करता. गांधीजींवर करु पाहत आहात, सरदार पटेलांवर, बाबासाहेब आंबडेकरांवर करु पाहत आहात हे चुकीचे आहे. ”
जय श्री राम विषयीच्या नाऱ्या विषयी बोलतान गोहलोत यांनी विरोधकांना झुंडशाहीमुळे बळी पडणाऱ्या घटनांचा संदर्भ देत खडे बोल सुनावले ते म्हणाले की, ”श्री राम हे नाव पुरुषोत्तम रामांचे प्रतिक आहे. या नावावर समाजात अशांतता निर्माण करणे चुकीचे आहे. सरकार पक्ष असो वा विरोधी पक्ष नाहीतर सामान्य जनता जबरदस्तीने जय श्री राम वा अल्ला हु अकबर बोलायला लावणे चुकीचे आहे. ” जय श्री रामच्या घोषणा देऊन आपण देशाला कोणत्या दिशेत घेऊन जातो आहोत याचा विचार करावा असे आवाहन ही त्यांनी केले.