बहुजननामा ऑनलाईन टीम : आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडोमोडीवर भाष्य करत महाविकासआघाडीला महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपावर प्रखर अशी टीकाही केली आहे. आपल्या कुटुंबियांमार्फत ट्विट केले आहे. “महाराष्ट्रात पहाटे चार वाजता राष्ट्रपती राजवट उठवण्याकरीता सह्यांसाठी राष्ट्रपती कार्यालयाला पाचारण करण्यात आली, हा या कार्यालयावरील एक प्रकारचा हल्लाच होता. यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत वाट का पाहण्यात आली नाही ? असा सवाल त्यांनी या ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.”
I have asked my family to tweet the following:
What will remain in memory of Constitution Day 2019 is the most egregious violation of the Constitution in Maharashtra between November 23 and November 26, 2019.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 27, 2019
या सोबतच चिदंबरम यांनी तुरुंगातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला शुभेच्छा देत या आघाडीला सरकार चालवताना काही सल्लेही दिले आहेत. चिदंबरम यांनी म्हटले की, “कृपया तुम्ही प्रत्येकाच्या पक्षहिताला सरकारमध्ये दुय्यम स्थान देत शेतकरी कल्याण, गुंतवणूक, रोजगार, सामाजिक न्याय आणि महिला व बालकल्याण या प्राधान्यक्रमाच्या तिन्ही पक्षांच्या समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रितपणे काम करा. ७४ वर्षीय चिदंबरम यांनी केंद्रात आघाडीची सरकारं बनवण्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे.”
I have asked my family to tweet the following:
What will remain in memory of Constitution Day 2019 is the most egregious violation of the Constitution in Maharashtra between November 23 and November 26, 2019.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 27, 2019
“संसदीय लोकशाहीच्या उत्क्रांतीचे निरीक्षण करणारे लोक अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या, विविधांगी, अनेकवचनी समाजासाठी काम करणाऱ्या राजकीय आघाड्या स्विकारतात. कारण, अशा आघाड्यांमधून राजकीय पक्ष तडजोड करण्यास शिकतात तसेच किमान समान कार्यक्रमावर सहमतही होतात,” असेही चिदंबरम आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Visit : bahujannama.com