बहुजननामा ऑनलाईन टीम : फडणवीस सरकारने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात आता महाविकासआघाडी सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून गुरुवारी शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र, हा शपथविधी थांबवावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, महाविकासआघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केली. मात्र त्यांचा शपथविधी रोखण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र जोशी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुकीआधी सेना-भाजपने युती केली होती. आता निकालानंतर ही युती तोडून नवीन आघाडी करून सरकार स्थापन करणं ही मतदारांची फसवणूक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यापासून थांबवावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
याआधीच महाविकासआघाडीनं आम्ही १६२ असे म्हणत शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळं महाविकासआघाडी आपले बहुमतही सिध्द करेल. दरम्यान महाविकासआघाडीकडून उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी तर, उप-मुख्यमंत्री म्हणून सध्या राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे.
Visit : bahujannama.com