नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात 21 जून रोजी होणारे सूर्यग्रहण दिसणार आहे. देशातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. मात्र या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमधील एका वैज्ञानिकाने मागील वर्षी 26 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रहणाचा संबंध थेट कोरोनाच्या प्रादुर्भावाशी जोडला आहे. सूर्यग्रहणानंतर उत्सर्जित होणार्या उर्जेच्या माध्यमातून प्रथम न्यूट्रॉन उत्परिवर्तित झाल्याने त्याच्या कणांमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याचा दावा या वैज्ञानिकाने केला आहे.
अणू विज्ञान आणि पृथ्वीशी संबंधित शास्त्रांचे जाणार असणार्या डॉ. के. एल. सुंदर यांनी सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. डिसेंबर 2019 पासून जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. शेवटचे सुर्यग्रहण झालं होतं तेव्हापासून सौरमालेमध्ये ग्राहांची एक विशेष रचना तयार झाली आहे, असे सुंदर म्हणाले. कोरोना विषाणू हा दोन ग्रहांमधील बळ भिन्नतेमुळे म्हणजेच फोर्स व्हेरिएशनमुळे वातावरणाच्या वरच्या थरामध्ये निर्माण झाला आहे. नवीन रचनेनुसार पृथ्वी अशी ठिकाणी आहे की त्यामुळे तिचे वातावरण या विषाणूसाठी अनुकूल आहे. सुर्याच्या उर्जेमधून प्रथम न्यूट्रॉन बाहेर पडत आहेत, असा अंदाज सुंदर यांनी व्यक्त केला आहे.
याच न्यूट्रॉनची वातावरणामधील काही विषाणूंबरोबर रासायनिक प्रक्रिया पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरामध्ये झाली असणार. त्यामधूनच या जैविक आणि अणू संवादाचे पडसाद म्हणून हा विषाणू तयार झाला असणार. या रासायनिक प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले उत्परावर्तिक प्रथिने हे या विषाणूंच्या उर्जेचा स्त्रोत असू शकतात, अशी शक्यता सुंदर यांनी व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार सर्वात प्रथम चीनमध्ये लक्षात आला असणार मात्र याबद्दल ठोसप्रकारे दावा करता येणारे पुरावे किंवा माहिती उपलब्ध नसल्याचेही सुंदर यांनी सांगितलं. हा विषाणू म्हणजे एखाद्या प्रयोगाचा किंवा मुद्दा उडवून आणलेल्या प्रक्रियेमुळेही निर्माण झालेला असू शकतो, असंही सुंदर म्हणाले.