पुणे – बहुजनामा ऑनलाईन – २०१२ रोजी सुरु केलेला शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग करून मी ब्राह्मण आणि मराठ्यांना जयभीम म्हणायला लावले,’’ मी जयभीमचा नारा कायमच बुलंद करत राहणार.असे प्रतिपादन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट (बार्टी) पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज् सेंटर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सयुंक्त विद्यमाने सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . विचारपीठावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र गवई उपस्थित होते. या वेळी परशुराम वाडेकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई वाडेकर यांच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने त्यांची पुस्तकतुला करण्यात आली. चळवळीतील इतर कार्यकर्त्यांच्या आईचाही सन्मान करण्यात आला.
‘‘लक्ष्मीबाई वाडेकर यांनी मोलमजुरी ,काबाडकष्ट करून मोठ्या कष्टातून मुलांना घडवले. प्रत्येक कार्यकर्त्याच्या त्या आई आहेत.’’ या वेळी आठवले यांनी त्यांच्या शैलीत कविताही सादर केली.
परशुराम वाडेकर हे आईविषयी बोलताना त्यांचे डोळे भरून आले. पुण्यामधील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आणि आईचा दांडगा परिचय आहे. आईने वेळप्रसंगी हलाखीची काम करून आह्माला जगवले . कामावर जाताना लहान भाऊ झोपेतून उठू नये म्हणून त्याच्या टाळूला अफू लावायची. चळवळीतील प्रत्येक आई असामान्य असते ’ मुलाच्या तोंडातून आपले कौतुक ऐकताना लक्ष्मीबाईं वाडेकर यांना गहिवरून आले.