बहुजननामा ऑनलाइन टीम : कमी आमदार असतानाही राज्यात कसे सरकार स्थापन केले जाऊ शकते, हे मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शिकलो. महाविकास आघाडीचे सरकार येण्यामागे शरद पवारांचा चमत्कार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत बुधवारी केले होते. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खासदार @PawarSpeaks साहेब, सहकार तथा अर्थमंत्री @Jayant_R_Patil जी, महसूल मंत्री @bb_thorat जी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष @Dwalsepatil जी, आमदार @AjitPawarSpeaks जी उपस्थित होते. pic.twitter.com/fAXDkJ2G96
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 25, 2019
निलेश राणे उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा माणूस स्वर्गीय बाळासाहेबांना विसरला. ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर शिवसैनिक घडवला त्यांचाच मुलगा त्यांना विसरुन रोज पवार साहेबांचे गुणगान गात आहे. कारण सोपे आहे, पवार साहेब नसते तर हे मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते, असे म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रत्येक मुद्द्यावर झोडपण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी बुधवारी दिवसभरात दोन-तीन ट्विट करत सेनेला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढली होती. मात्र, निकालानंतर शिवसेनेने वेगळी वाट धरत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सलगी केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यात शरद पवारांचा मोठा वाटा आहे.
Visit : bahujannama.com