मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मला भाजप राज्यसभेवर पाठवणार आहे. हे सांगितले जात होते. परंतु त्यात काही तथ्य नाही. मी इतके वर्ष जनाधार जमवला आहे. हीच माझी सत्ता आहे. मी सत्तेचा भुकेला नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे भाजपकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेचे सदस्यत्व दिले जाणार असल्याच्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
तर येत्या विधनासभा निवडणूकीत कॉंग्रेसला ४० जागा दिल्या असल्याचे वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. कॉंग्रेसला मान्य असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे वृत्त होते. परंतु कॉंग्रेसला आम्ही ४० जागा दिल्या आहेत. त्यांना मान्य असेल तर त्यांनी सोबत यावं. असं मागणी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
तर एमआयएमने १०० जागांची मागणी केल्याची माहिती आहे. मात्र अजून तरी अशी तशी मागणी आमच्यापर्यंत आली नाही. ओवेसी यांच्यासोबत बैठक झाली. त्यात सोबत राहू असं ठरलं आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता एमआयएमने १०० जागा मागितल्याचे, कॉंग्रेसला ४० जागा दिल्याचे आणि प्रकाश आंबेडकर यांना भाजप राज्यसभेवर पाठविणार असल्याच्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे.
मी वन मॅन आर्मी
तुमचं ईव्हीएमबाबत शरद पवार यांच्याशी एकमत आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर माझं कुणाशी एकमत नाही. मी वन मॅन आर्मी आहे असं उत्तर त्यांनी दिलं.