मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीने आज एनआरसी आणि सीएए विरोधात बंद पुकारला असून त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहेत. अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण आले आहे. आंदोलन करणाऱ्यांनी अमरावतीमधील इर्विन चौकाजवळ असलेल्या दुकानांवर दगडफेक केली आहे. पण दगडफेक करणाऱ्यांना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता सर्वत्र शांतता असून अमरावती शहर सुरळीत सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी इर्विन चौकात जमा झाले होते, पण काही वेळांनंतर त्यांनी तेथील दुकानांवर दगडफेक सुरु केल्याने पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला.
तर एकीकडे अकोल्यामध्येही बंद दरम्यान गोंधळ झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दुकानं बंद करत असताना वंचितचे कार्यकर्ते आणि भाजपचे आमदार यांच्यात वाद झाला आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि वंचितचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक स्वरूपातला वाद झाला आहे. ही घटना अकोल्यातील स्टेशन चौकात घडली आहे. वंचितचे कार्यकर्ते सकाळपासूनचा शहरभर फिरत लोकांना बंदचे आवाहन करत होते. दरम्यान भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर केला आहे.
तसेच भाजपचे कार्यकर्ते असे प्रकार सहन करणार नसून ते स्वतःही या गोष्टी सहन करून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळेच पुढे दोन पक्षांमध्ये वाद सुरु झाला. पुढे वंचितच्या कार्यकर्त्यांनी रणधीर सावरकरांना बघत नारेबाजी करायला सुरुवात केली. तसेच हा कायदा तुम्ही आणले असून त्यामुळेच आम्हाला अशी आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे वंचितचे कार्यकर्ते म्हणाले. एवढेच नाही तर तुम्हाला पहिले की आमचं रक्त सळसळत, असेही वंचितचे कार्यकर्ते म्हणाले आहेत. पण तेथील काही लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्यामधील वाद थांबला.
Visit : bahujannama.com