नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेना प्रमुखपदी निवड झाल्यानंतर जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पहिल्यांदाच एलओसीची पाहणी करत जवानांच्या भेटी घेतल्या आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जवानांना कोणत्याही अडचणींना तयार राहण्यासाठी सांगितले. नरवणे हे नव्याने तयार झालेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांनी येथे राजभवनात लेफ्टनंट गव्हर्नर जीसी मुर्मू यांची भेट घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचे व्यापस्थापन, विशेषतः घुसखोरीचे प्रयत्न आणि दहशतवादविरूद्ध सुरु असलेल्या कारवाई बद्दल चर्चा केली. सेने प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह हेदेखील उपस्थित होते. त्यांनी सैनिकांना आपल्या कर्तव्याची आठवण करून देत त्यासाठी तत्परता दाखवण्यासाठी प्रेरित केले.
सेनाप्रमुखांनी आदल्या दिवशी उधमपूर येथील नॉर्दन कमांड कार्यालयाला भेट देत त्यांना लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी एलओसीवरील सद्यस्थितीबाबत माहिती दिली. जनरल नरवणे यांनी शत्रूने निर्माण केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केल्याची माहिती मिळत आहे. तसेच सेना प्रमुखांच्या भेटीदरम्यान मुर्मू यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत लष्कर, अन्य सुरक्षा दल आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचे कौतुक केले, असे राजभवनातील एका प्रवक्त्याने सांगितले.
Visit : bahujannama.com