नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या अर्थव्यवस्थेवर आर्थिक मंदीचे सावट असताना देशातील दिग्गज आयटी कंपनीने विद्यार्थ्यांना एक खुशखबर दिली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजी कॉलेज कंपासच्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांची भरती करणार असून चालू वर्षामध्ये कंपनीने कॉलेज कॅम्पसमधील ८,६०० विद्यार्थ्यांची भरती केली होती. कंपनीच्या मुख्य मानवी संसाधन (HR) अप्पाराव व्ही.व्ही. यांनी या आर्थिक वर्षात आम्ही व्यवस्थापन व तांत्रिक विभागात दाखल झालेल्या लोकांच्या वेतनात १५ ते २० टक्के वाढ केली असल्याचे म्हटले आहे.
या पदवीधारकांना १५-२० लाखांचे पॅकेज
आयआयएम – अहमदाबाद, बंगलोर आणि कोलकाता, आयएसबी, एक्सएलआरआय तसेच एसपी जैन येथील मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला २० ते ३० लाख रु. चे पॅकेज देते. तर आयआयएम-कोझिकोड, इंदूर आणि लखनऊच्या मॅनेजमेंट पदवीधारकांना कंपनी वार्षिक १५ ते १८ लाख इतके पॅकेज देते. तसेच कंपनी इतर महाविद्यालयांच्या पदवीधारकांना वर्षासाठी साडेचार ते सात लाख रु.चे पॅकेज देते.
IIT ग्रॅज्युएटला १२-१५ लाख
मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतलेल्यांना ग्लोबल इंगेजमेंट मॅनेजर ट्रेनिंग प्रोग्रॅम मधून जावे लागते. त्यावर जीईएमला प्रशिक्षण देणाऱ्यांना मुळात विक्री आणि पूर्व विक्री विभागात ठेवले जाते, तर उर्वरित व्यवसाय विश्लेषक म्हणून काम करतात, असे अप्पाराव यांनी सांगितले. तांत्रिक विद्यार्थ्यांचा प्रश्न आयआयटी पदवीधारकांना कंपनी दरवर्षी १२ ते १५ लाख पॅकेज देते. एनआयटीच्या विद्यार्थ्यांना ८ ते १२ लाख रु. दिले जातात. एचसीएलकडून बारावी पास विद्यार्थ्यांनाही भरती केले जात असून त्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना नऊ महिन्यांचे प्रशिक्षण आणि तीन महिन्यांची नोकरी दिली जाते.
Visit : bahujannama.com