बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. सर्वच पक्ष जनतेचे लक्ष केंद्रित करण्याची पक्षाचे जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध करत आहेत. त्यात आता भारतीय जनता पक्षानेदेखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याबरोबरच पाच वर्षात एक कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील केले आहे.
दिलेली आश्वासने :
१) येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल .
२) पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यातून थांबवून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाकडे नेले जाईल.
३) मराठवाडा वॉटर ग्रीड महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून ११ बांधांना आपापसात जोडून संपूर्ण मराठवाड्यात पाईपलाईनद्वारे जोडण्यात येईल.
४) २०२२ पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी दिले जाईल. मूलभूत सुविधांसाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
५) येत्या ५ वर्षात शेतीमध्ये वापरली जाणारी वीज सौर ऊर्जेवर आधारित १२ तासांपेक्षा जास्त दिवस शेतकऱ्यांना पुरविली जाईल.
६) येत्या पाच वर्षांत १ कोटी रोजगार निर्मिती होईल. १ कोटी कुटुंबांना महिला बचत गटाशी जोडून रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करुन देण्यात येतील.
७) कृष्णा कोयना व इतर नद्यांच्या पुरामुळे वाहणारे जास्त पाणी पश्चिम महाराष्ट्राच्या कोरड्या भागात वळवले जाईल.
Visit : bahujannama.com