नाशिक : बहुजननामाऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकीत युती झाल्यामुळे भाजप आणि शिवसेनेमधील अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली होती. मात्र आता नाशिकमधील शिवसेनेच्या स्थानिक ३५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत ज्यात ३६ नगरसेवकांचा समावेश आहे. नाशिक पश्चिमची जागा भाजपाला गेल्याने तेथून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचे गटनेते विलास शिंदेंनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. शिवसैनिकांनी शिंदेना पाठिंबा दर्शविला आहे.
काही दिवसांपुर्वीच शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. कल्याण आणि परिसरातील सेनेच्या तब्बल 26 नगरसेवकांनी राजीनामा दिला होता. त्या घटनेला काही दिवस पुर्ण झाले नाही आणि मतदानाची तारीख जवळ असतानाच शिवसेनेच्या 36 नगरसेवकांनी आणि तब्बल 350 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.
यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीधर्म कसा पाळला हे सांगितले तसेच शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना याबाबतची कल्पना देण्यात येईल आणि त्यावर मार्ग काढण्यात येईल असे सांगितले आहे. घडलेला प्रकार हा दुर्देवी असल्याचे देखील खा. राऊत यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्हयामध्ये भाजपकडून शिवसेनेला काऊंटर करण्यात येत आहे. दरम्यान, खा. राऊत यांनी राजीनामे दिलेल्यांवर काय कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आलेले नाही. सीमा हिरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना युतीतील कार्यकर्त्यांनी युती धर्माचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Visit : bahujannama.com