बहुजननामा ऑनलाइन टीम : मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा कमी झालेल्या दिसून येत आहे. त्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतृत्वाने डावललेल्या नेत्यांनी आता आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.
एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधून म्हटले की, ‘माझ्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता या नेत्यांना तिकीट न देता सोबत उभे केले असते तरी पक्षाच्या जागांमध्ये वाढ झाली असती. मात्र आम्हाला डावलण्यात आले. कठीण प्रसंगी ज्यांनी पक्षाला साथ दिली मात्र, अशाच नेत्यांना बाजुला ठेवण्यात आले.’
त्याचबरोबर एकनाथ खडसे यांनी म्हटले की, ‘अजित पवार यांच्याविरोधातील पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले, तेव्हा रद्दीचा भावही चांगला होता’ एकनाथ खडसे हे गेल्या चार दशकांपासून भाजपामध्ये सक्रिय आहेत. अनेक वर्ष त्यांनी विधिमंडळात गाजवली आहे. त्यांनी दिर्घकाळ विरोधीपक्षनेते म्हणून काम केले आहे. मात्र, या विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी उमेदवारी नाकारुन त्यांची मुलगी रोहिनी खडसे यांनी तिकीट दिले होते. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे विधिमंडळात सक्रिय असणारे खडसे राजकारणातून दूर गेले. अनेक वर्षे एकनाथ खडसे पक्षावर नाराज होते. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
Visit : bahujannama.com