बिहार : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टोकाचे आरोप -प्रत्यारोप होताना दिसत आहे ‘भाजप तसेच जनता दल नेते हे जल्लाद असल्याची टीका राबडीदेवी यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधींनी पंतप्रधानांना दुर्योधन बोलून चूक केली आहे. त्यांना जल्लाद हीच उपमा योग्य आहे .
निवडणुकींच्या तोंडावर बिहारच्या जनता दल (यूनाइटेड ) पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारतीची तुलना शूर्पणखा बरोबर केली होती. यावरून चांगलेच वादंग निर्माण झाले होते .यावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी संजय सिंह यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुर्योधन म्हंटले होते .राबडीदेवी देवी यांनी प्रियंका गांधी यांच्या मोदींना दिलेल्या उपमेवर देखील भाष्य केले आहे.
Rabri Devi on Priyanka Gandhi calling PM Modi 'Duryodhana': Unhone Duryodhan bol ke galat kiya hai,doosra bhasha bolna chahiye unko, vo sab to jallad hain, jallad. Jo judge ko aur patrakar ko marwa deta hai, uthwa leta hai. Aise aadmi ka mann aur vichaar kaisa hoga, khoonkar hoga pic.twitter.com/DbIx1ydZ1Q
— ANI (@ANI) May 8, 2019