नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ग्राहकांच्या अयशस्वी व्यवहाराच्या तक्रारी लक्षात घेऊन टर्न अराऊंड टाइम (टीएटी) निश्चित केला. याअंतर्गत, एखाद्या ग्राहकाचा व्यवहार अयशस्वी झाल्यास बँका एका ठराविक मुदतीत तोडगा काढतील आणि तसे न झाल्यास बँका ग्राहकांना नुकसान भरपाई देतील. आरबीआयने सांगितले की, ग्राहकांनी तक्रार करण्याआधी बँकेने त्यांना भरपाई द्यायला हवी. ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन केंद्रीय बँकेने पहिल्यांदा एप्रिल महिन्यात टिएटी बद्दलची घोषणा केली होती.
आरबीआई ने आठ वर्गवारीत नवीन व्यवहारांची मांडणी केली आहे. यात एटीएम बाबतचे व्यवहार, कार्डची देवाणघेवाण, तत्काळ व्यवहार, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि प्रीपेड कार्ड बाबतच्या गोष्टींचा समावेश आहे.
ट्रांजेक्शन नंतर पाच दिवसात खात्यात पैसे परत करावे लागणार आहेत.दिलेल्या वेळेपेक्षा उशीर केला तर ग्राहकाला शंभर रुपये प्रत्येक दिवशी असा दंड भरावा लागणार आहे.याबाबतचे आदेश आरबीआयने बँकांना दिलेले आहेत. घरकांचा विश्वास संपादित करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. ज्यांच्या तक्रारींचे निवारण होऊ शकले नाही असे ग्राहक बँकिंग लोकपालला आपली तक्रार देऊ शकतात.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ