बहुजननामा ऑनलाईन – बिहार येथील गोपालगंज जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर लग्नानंतर एक महिला काही दिवसांनी तिच्या भाच्याच्या प्रेमात पडली. आणि नंतर तिने त्याच्याबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिने केवळ हा निर्णय घेतला नाही, तर त्याची अंमलबजावणी देखील केली आहे. तर मामी आणि भाचा यांच्या प्रकरणामुळे त्या शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील गोपालगंज जिल्ह्यात या प्रकरणात पीडित मामाने त्याच्या भाच्यासह ४ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तर त्या महिलेचा पती राकेश शर्मा हरपूर गावचा रहिवासी आहे. राकेशचं २२ फेब्रुवारी महिन्यात मोठ्या थाटात लग्न झालं. आताच संसार सुरु झाला असतानाच लग्नानंतर आठवडाभरात नवरी आणि तिचा भाचा यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले. तर राकेशचं हार्डवेअरचं दुकान आहे. राकेशच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा भाचा काही मित्रांसह मामीला भेटायला जायचा. या भेटीमध्ये दोघांचं प्रेम जमलं आणि ते एके दिवशी फरार झाले. राकेशनं या प्रकरणात मंगळवारी मांझा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, राकेशने दिलेल्या तक्रारीवरून ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाचा आणि त्याच्यासोबत पळून गेलेली त्याची मामी यांचा शोध सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण प्रेम संबंधातून घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणावरून पोलीस अधिक तपास करत आहेत.