बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव निवडणुकीवर(Bihar elections) स्पष्ट दिसत आहे. यावेळी झालेल्या बिहार निवडणुकीतसुद्धा(Bihar elections) योगी आदित्यनाथ यांनी झंझावती प्रचार केला, ज्याचा फायदा आतापर्यंतच्या निकालात भाजपला स्पष्ट दिसत आहे. भाजप बिहारमध्ये सर्वांत मोठी पार्टी बनली आहे. इतकेच नव्हे, मतांच्या बाबतीत ते आपला मित्रपक्ष जदयूच्यासुद्धा पुढे गेले आहेत. भाजपची खेळी अचूक ठरली आणि योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये जिथे-जिथे रॅली केल्या, तेथे भाजपने चांगली कामगिरी केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी भाजपसाठी 6 दिवसांत 18 रॅली केल्या होत्या. योगी यांनी एका दिवसात तीन रॅली केल्या.
या विधानसभा निवडणुकीत भाजपचा फोकस त्या जागांवर होता, जिथे बिहारमध्ये 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाआघाडीने त्यांचे नुकसान केले होते. यासाठी सीएम योगी आदित्यनाथ यांनी याच जागांवर फोकस केला होता. जमुई, काराकाट, पालीगंज, तरारी, अरवल या ठिकाणी त्यांनी प्रथम प्रचार केला.
निवडणूक आयोगाकडून जारी दुपारी 3 वाजेपर्यंतच्या आकड्यांनुसार, जमुईमध्ये भाजपच्या श्रेयसी सिंह सर्वांत पुढे होत्या. अरवलमध्ये भाजपचे दीपक कुमार शर्मा आणि सीपीआई एमएमएलचे महानंद सिंह यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. काराकाटमध्ये भाजपचे राजेश्वर राज आणि सीआयएमएलएलचे अरुण सिंह यांच्यात जोरदार लढत सुरू आहे. रामगढमध्येसुद्धा भाजपचे अशोक कुमार सिंह आणि बीएसपीच्या अंबिका सिंह यांच्या जोरदार लढत सुरू आहे.
याशिवाय ज्या विधानसभा जागांवर योगी आदित्यनाथ प्रचारासाठी पोहोचले होते. त्यामध्ये पूर्णिया, सहरसा, सिवान, गोरेयाकोठी, भागलपूर, गोविंदगंज, झंझारपूर आणि दरभंगाचा समावेश आहे. येथेसुद्धा योगींचा प्रचार यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या आकड्यांनुसार, या जागांची स्थिती अशी आहे-
पूर्णिया- भाजपचे विजय कुमार खेमका विजयाच्या जवळ
सहरसा- भाजपचे आलोक रंजन विजय निश्चित
सिवान- भाजपचे ओम प्रकाश यादव विजयाच्या जवळ
गोरेयाकोठी-भाजपचे देवेश कांत सिंह यांचा विजय निश्चित
भागलपूर- भाजपचे रोहित पांडेय यांचा विजय निश्चित
गोविंदगंज- भाजपचे सुनील मणी तिवारी यांचा विजय निश्चित
झंझारपूर- भाजपचे नितिन मिश्रा यांचा विजय निश्चित
दरभंगा- भाजपचे संजय सराओगी यांचा विजय निश्चित
अशाप्रकारे पाहिल्यास या 18 जागांपैकी 9 ते 10 जागांवर योगींच्या प्रचाराचा चांगला परिणाम दिसत आहे आणि भाजप चांगली कामगिरी करत आहे.
बिहारच्या अनेक भागात गोरक्षपीठांचा चांगला प्रभाव आहे. याचाच योगी आदित्यनाथ आणि भाजपने बिहारमध्ये वापर केला. विशेषकरून बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांत, पूर्व बिहार, उत्तर बिहार आणि मिथिलांचलच्या परिसरात गोरक्षपीठांचा खूप परिणाम आहे.
लॉकडाउनच्यावेळी जेव्हा प्रवासी मजुरांच्या घरवापसीचा मोठा मुद्दा समोर होता, अशावेळी योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे यूपीसह बिहारमध्येसुद्धा कौतुक करण्यात आले. मोठ्या संख्येने बिहारच्या मजुरांना बॉर्डरपर्यंत पोहाेचवण्याचे काम योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने केले होते. म्हणून, परतणारे प्रवासी मजूर आणि तरुणांमध्ये योगींची जबरदस्त क्रेझ असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.