बीड : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील पोलीस भरती ही जुन्या पध्दतीने करण्यात यावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. नवीन पोलीस भरतीमध्ये आधी लेखी परिक्षा होणार आहे. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी पात्र ठरणार असल्याने आर्थिक दृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.
तसेच नवीन नियमांनुसार लेखी परीक्षा ही १०० गुणांची राहणार असून मैदानी चाचणी १०० ऐवजी ५० गुणांची होणार आहे. या नवीन नियमांमध्ये सुधारणा करून जुन्या पध्दतीने भरतीची प्रक्रि या करावी. या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी ॲड. रविंद्र पाटोळे, बबन वडमारे, किरण वाघमारे, संतोष जोगदंड, मिलिंद घाडगे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.