बहुजननामा ऑनलाईन – महायुतीला राज्यभरात जनतेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून यंदा बारामतीच्या जागेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती मतदारसंघ हा पवारांचा गड असून यंदा पवारांच्या गडाला आम्ही सुरुंग लावणार असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या उमेदवार कांचन कूल या प्रचंड मतांनी निवडून येतील असंही ते म्हणाले आहेत.
२०१४ च्या निवडणुकिला बारामतीमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी महायुतीकडून निवडणूक लढविली होती. पण त्यांना अपयश आले होते जर त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असती तर ते निश्चित विजयी झाले असते. मात्र यंदा महायुतीकडून बारामतीमधून कांचन कूल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तेथील जनता त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजयी निश्चित असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे गेली निवडणुक हि भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावर लढविली आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले होते आणि यंदाची निवडणूक ही आम्ही विकासाच्या मुद्यावर लढवत असल्याने मागील निवडणुकी पेक्षा यावेळी जास्त जागा मिळतील’.