लातूर बहुजननामा ऑनलाईन – प्रकाश आंबेडकरांची विचारधारा वंचितांच्या कल्याणाची आहे. त्यामुळेच लोक वंचितच्या मागे आहेत. काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हटले आहे. परंतु याचा आमच्यावर काहीही परिणाम झालेला नाही असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अड. अण्णाराव पाटील यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीसाठी सध्या मराठवाड्यात मुलाखती सुरु आहेत. त्यावेळी लातूर येथे ते बोलत होते. राज्यात मराठवाड्यात उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात मुलाखती पार पडल्या. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उमेदवारी देताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना ती दिली जाणार नाही. असंही त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच अनेक राजकिय पक्षांचे नेते आमच्या संपर्कात आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आमचे नेटवर्क तयार झाले आहे. वंचितांना न्याय देण्याची भूमीका वंचित बहुजन आघाडीची आहे. ती सर्वांना पटली आहे. राज्यात विषमता नष्ट करून समानता आणण्याचा आमचा विचार आहे असे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी सांगितले.