पुणे बहुजननामा ऑनलाईन – पीक विमा योजनेत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या आरोपावरून शिवसेनेने राज्यभरात आंदोलन केले. परंतु हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडला गेला तेव्हा शिवसेनेचे मंत्री काय झोपा काढत होते का ? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. पुण्यात एका कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते.
त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना पीक विमा कंपन्यांविरोधात सेनेने केलेल्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यासोबतच विमा कंपन्या नफा कमविण्यासाठीच आल्या आहेत. त्यांच्या नफ्यात असलेले वाटेकरी कोण आहेत. याचा तपास झाला पाहिजे. असं ते यावेळी म्हणाले.
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न ग्राह्य धरले जाते. त्यात मोठी गफलत आहे. एखाद्या तालुक्यात,गावातले उत्पन्न पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निश्चित करते. त्याआधारे विमा देणे गरजेचे आहे. परंतु चार पाच वर्षांपासून दुष्काळ आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले. त्याचा विमा कंपन्यांना फायदा होतो. असे कडू यावेळी म्हणाले.