मुंबई : ( बहुजननामा ऑनलाइन ) – आगामी विधानसभा निवडणुक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मात्र ही निवडणुक ईव्हीएमव्दारेच होणार असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान तुम्ही मतदान केले आणि मताबाबत खात्री केली. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. अफवांमुळे गोंधळून जाऊ नका, असे आवाहन आयोगाने केले आहे. ईव्हीएम कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही असा दावा देखील निवडणूक आयोगाने केला केला आहे.
ईव्हीएमबाबतचे गैरसमज दूर करत त्याबाबद जनजागृती करण्याचे काम निवडणुक आयोगाच्या निर्देशाने सरकारने हाती घेतले आहे. ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले. तसेच त्यांनी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी पाहिली का याबाबत खातरजमा करूनही ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत शंका घेण्यास ठोस आधार नसल्याचा दावाही या जनजागृतीच्या माध्यमातून केला जाऊ लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत देशभरात १७ मतदारांनी व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठीवर चुकीचे मुद्रण झाल्याचा दावा केला होता. परंतु, या शंकांचे निरसन केल्याचा दावाही आयोगाने केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमबद्दल विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेव्दारे घ्याव्यात अशी मागणी देखील करण्यात येते होते. याच मागणीसाठी राज ठाकरे दिल्लीमध्ये निवडणुक आयोगाच्या प्रमुखांना भेटत ईव्हीएम विषयीचा आपला आक्षेप नोंदविला. मात्र ई ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड करता येवू शकत नाही, असा दावा करत आगामी विधानसभा ईव्हिएमव्दारे घेण्याचे निवडणुक आय़ोगाने निश्चित केले आहे.