नवी दिल्ली : वृत्तसंस्था –अयोध्या रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आता आठवड्यातून पाच दिवस होणार आहे. त्यामुळे ही मागील ३४ वर्षांपासून सुरु असलेली सुनावणी लवकरच पुर्ण होणार असल्याची शक्यता आहे. यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने आठवड्यातील तीन दिवस सुनावणी घेतली जाईल असे सांगितले होते. त्यामुसार आज नियमित सुनावणी घेण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या वादाला तब्बल पाच शकते म्हणजे ४९१ वर्षांचा इतिहास आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. ते निवृत्त होईपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पुर्ण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु त्याआधी सुनावणी पुर्ण न झाल्यास नवीन सरन्यायाधीशांपुढे ती नव्याने करावी लागणार. त्यामुळे आठवड्याचे पाच दिवस सुनावणी होणार असल्याचे जाहीर झाल्याने आता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कार्यकाळातच ती पुर्ण होण्याची शक्यता आहे.
याआधी आठवड्यातील तीन दिवसांऐवजी ५ दिवस ही सुनावणी होणार आहे. आज युक्तीवाद करताना अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले. बुधवारी निरमोही आखाडा विवादित जागेवर आपला मालकी हक्क सांगत होते. त्याचे कोणतेही पुरावे ते देऊ शकले नाही. मालकी हक्क सांगण्यासाठीचे दस्तऐवज एका दरोड्यात चोरीला गेल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.