नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) सराव सामन्यात भारत अ संघाचा डाव सावरला. रहाणेच्या नाबाद ११७ धावांच्या जोरावर भारत अ संघानं ९ बाद २४७ धावांवर डाव घोषित केला. सामन्यास प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाचा निम्मा संघ ९८ धावांवर बाद झाला होता. दरम्यान, कॅमेरून ग्रीन आणि टीम पेन यांनी दमदार कामगिरी केली. आणि ऑस्ट्रेलियाला कमबॅक करून दिलं. ही सर्वाना तोड देणारी जोडी उमेश यादवनं तोडली. पृथ्वी शॉ यानं पेनला माघारी जाण्यास भाग पाडलं. पृथ्वी शॉ यानं अफलातून झेल टिपला.
दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं डाव घोषित केला. उमेश यादवनंही १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २४ धावांची आक्रमक खेळी केली. रहाणे व कुलदीप यादव या दोघांनी सातव्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. कुलदीपनं ७८ चेंडूंत १५ धावा केल्या. भारत संघाला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाचे सलामीवीरही अपयशी ठरले. विल पुकोवस्की ( १) आणि जो बर्न्स ( ४) यांना उमेश यादवनं माघारी पाठवलं. मार्कस हॅरिस ( ३५), कर्णधार ट्रॅव्हीस हेड ( १८) आणि निक मॅडीन्सन ( २३) यांनी ऑसींचा डाव सावरला, परंतु ते ९८ धावांवर माघारी परतले. ५ बाद ९८ अशा अवस्थेत सापडलेल्या ऑस्ट्रेलियासाठी ग्रीन व पेन ही जोडी धावली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या.
उमेश यादवनं ही जोडी तोडली. टीम पेन ८८ चेंडूंत ४ चौकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. पृथ्वी शॉनं त्याला सुरेख झेल टिपला. ६४ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २१६ धावा झाल्या होत्या. ग्रीन ८२ धावांवर खेळत असून ऑस्ट्रेलिया अजून ३१ धावांनी पिछाडीवर आहे. प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि वृद्धीमान सहावर माघारी फिरले. चेतेश्वर पुजारा ( ५४) आणि रहाणे ( ११७) यांनी टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. रहाणेनं २४२ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह नाबाद ११७ धावा केल्या.