मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून तिन्ही पक्षाचे सरकार आहे. विशेष म्हणजे काही मुद्यावर या पक्षांमध्ये मतभेद देखील दिसून येतात. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था आणि विधानसभा (Assembly) निवडणुका हे एकत्र लढणार का? असा प्रश्न सर्वांपुढे येत होता. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँगेसची भूमिका स्पष्ट करत स्थानिक स्वराज संस्था आणि विधानसभा (Assembly) निवडणुका या स्वबळावरच लढणार असल्याचं पटोले यांनी म्हटलंय.
आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस हा सध्या ४ थ्या क्रमांकाचा पक्ष आहे , मात्र, २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल.
असे देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे, तसेच महाविकास आघाडी सरकार हे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आलं आहे.
तेही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची आखणी केल्यानंतर सरकार स्थापन झाले.
म्हणून येत्या काळात सरकारच्या योजना जनतेला पाहायला मिळतील असे पटोले म्हणाले.
दरम्यान, पुढे नाना पटोले म्हणाले, कोरोना हा देशाला आर्थिक डबघाईला आणणारा आजार आहे.
हे सगळ्यात आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले होते.
या आजाराला गांभीर्याने घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.
परंतु, भाजपच्या काही लोकांनी त्यांना समाजमाध्यमांवर वेड्यात काढले.
आता परिस्थिती आपण पाहातच आहोत, असं कोरोनाच्या परिस्थितीला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केले आहे.
फायजर-मॉडर्नानंतर आता सीरमने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’
देशात कोरोना लसींची टंचाई असल्यानं मोदी सरकारनं घेतला हा मोठा निर्णय
मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ; पुन्हा नवीन गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण