गुवाहाटी : वृत्तसंस्था – आसाममधील ऑइल इंडिया लिमिटेडच्या तेलविहिरीत मोठा स्फोट झाल्यानंतर आग लागली होती. ही आग गेल्या काही दिवसांपासून धुमसत आहे. 14 दिवसांपासून सुरू असलेल्याा या आगीने रौद्र रुप धारण केले असून आता आसपासच्या गावांमध्ये आग पसरली आहे. आगीत 6 जण जखमी झाले आहेत. तर आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये ही आग वेगाने पसरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
आसामचे पर्यावरण व वनमंत्री परिमल सुखाबैद्य म्हणाले, आसाममधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसाम सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण ही आग आता जवळपासच्या गावांमध्ये वेगाने पसरत आहे. आगीमुळे गावातील 6 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी साधारण एक महिना लागू शकते असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.देशातले महत्त्वाचे खनिज तेल उत्पादक केंद्र असलेल्या बघजन ऑइल इंडिया लिमिटेडच्या तेलविहिरीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली.
Assam govt is trying its best to control the fire. Around 6 people have been injured & fire has spread in the nearby villages: Parimal Suklabaidya, State Environment & Forest Minister on fire that broke out at gas well of Oil India Ltd at Baghjan in Tinsukia (9/6) pic.twitter.com/AYhC0f5OoY
— ANI (@ANI) June 9, 2020
https://twitter.com/TrusfratedMochi/status/1270421299911745536
गेल्या 14 दिवसांपासून या तेलविहिरीत वायूगळती होत होती. या वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असतानाच अचानक आग लागली. या आगीचे लोळ आणि धूर अनेक किलोमीटरपर्यंत दिसत आहेत. तेलविहिरीत वायूगळती होऊ लागल्याचे लक्षात येताच गेल्याच आठवड्यात इथून सर्व नागरिकांना आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे
https://twitter.com/Priyakhi2/status/1270373952108425216