औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाच काल रात्राी औरंगबादमध्ये दुहेरी हत्येने औरंगाबाद हादरले आहे. रात्री बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. बीड बायपासवरील एमआयटी चौक परिसरात ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
सौरभ खंदाडे आणि किरण खंदाडे अशी खून करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किरण पुण्याला उच्च शिक्षण घेत होती, तर सौरभ दहावीत शिकत होता. दोघेही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घरीच होते. मंगळवारी खंदाडे दाम्पत्य घरातील कामे आवरून शेतात गेले होते. संध्याकाळी परतल्यानंतर घरात रक्ताच्या थारोळ्यात बहिण – भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खूनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा खून दागिन्यांसाठी झाला असावा खंदाडे दाम्पत्यांनी पोलिसांना फिर्यादीमध्ये सांगितले आहे.