पटणा : वृत्तसंस्था- बिहारमध्ये सध्या अनेक राजकीय वक्तव्ये केली जात आहेत. बिहार विधानसभा निवडणूक 2020 पूर्वी राज्यात रोज काहीतरी राजकीय संघर्ष होत आहेत. तिकडे जेडीयूचा अंतर्गत कलह शांत झालेला नसतानाच काँग्रेसमध्ये शत्रुघ्न सिन्हांच्या बाबतीत पक्षातील नेत्यांमध्ये उघड मतभेद दिसत आहेत. यावर जेडीयू नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना साथ दिली आहे आणि काँग्रेसवर टीका केली आहे. तर, आरजेडीसुद्धा शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाठीशी आहे.
जेडीयू नेते अशोक चौधरी म्हणाले की, काँग्रेसची हीच परंपरा आहे आणि पक्ष यूज अँड थ्रो रणनीतीवर काम करत आहे. काँग्रेसची आपली जुनी खोड मोडलेली नाही. जेव्हा कुणाची गरज असते तेव्हा त्याचा वापर केला जातो आणि नंतर दूर फेकले जाते. पक्ष यातून कधी पुढे गेलाच नाही. चौधरी यापुढेही म्हणाले की, काँग्रेसचे संस्कारच हे आहेत. शत्रुघ्न सिन्हा भाजपामधून काँग्रेसमध्ये आले आणि इतके दिवस उलटल्यानंतर पक्षातील नेत्यांना समजले की, त्यांचा आत्मा आरएसएसमध्येच आहे. शत्रुघ्न सिन्हा त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी चांगले वाटत होते. शत्रुघ्न सिन्हा यांचे राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.
चौधरी म्हणाले, त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांना असे बोलणे योग्य नाही. तर काँग्रेसच्या या वादात आरजेडीने शत्रुघ्न सिन्हा यांना साथ दिली आहे. सिन्हा यांच्याबाबत वक्तव्य करणारे प्रमोद कृष्णन यांच्या बाबत म्हटले आहे की, अशा प्रकारची वक्तव्य करणार्या नेत्यांची पक्षात काहीही ओळख नाही. आपसातील रागातून अशी वक्तव्य केली जात आहेत. तर, भाई बीरेन्द्र यांनी म्हटले की, लायक नेते नसल्याने त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. त्यांचे काहीतरी वैयक्तिक शत्रूत्व असेल म्हणून असे वक्तव्य केले असेल. शत्रुघ्न सिन्हा मोठे नेते आहेत. त्यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे. त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरणे योग्य नाही.