बहुजननामा ऑनलाइन टीम – पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami ) यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन सुरू केले. यावर खासदार संजय राऊत ((sanjay raut ) यांनी टीका केली आहे. अर्णब प्रकरणी दिल्लीत काय हालचाली सुरू होत्या हे सत्य मी जर मांडलं तर सर्वांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला .
अर्णब गोस्वामी(Arnab Goswami ) यांना पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि गोस्वामींच्या न्यायालयीन कोठडीचा संबंध काय?, अर्णव त्यांचे कार्यकर्ते भाजप काल रस्त्यावर उतरली होती तो त्यांचाच पक्षाचा असावा. अर्णब यांना झालेली अटक हा चौथ्या स्तंभावर असलेला हल्ला आहे, असं मानायला पत्रकार तयार नाहीत. कारण हे प्रकरण पत्रकारितेशी संबंधित नसून आत्महत्येशी संबंधित आहे, असं ही त्यांनी सांगितलं. याप्रकरणी काल दिल्लीत पडद्यामागून नेमक्या काय हालचाली सुरू होत्या, हे सत्य मांडण्याचा प्रयत्न जर मी केला तर सर्वांची पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, भाजपने आंदोलन करण्यापूर्वी या मराठी कुटुंबावर काय संकट कोसळलं हे पाह्यला हवं होतं. अन्वय नाईक हे मराठी होते. त्यांनी अर्णब यांच्या स्टुडिओचं काम केलं. त्याचे पैसे त्यांना मिळाले परिणामी त्यांनी आत्महत्या केली. त्या धक्याने त्यांच्या 80 वर्षीय सासूबाईही गेल्या.
मानवता आणि सत्य हे शब्द भाजपने वापरू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. रिया चक्रवर्ती, सुशांतसिंग राजपूत आणि अन्वय नाईक या दोन्ही प्रकरणात भाजपची भूमिका वेगवेगळी आणि दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.