बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. 2018 साली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक(Anvay Naik) यांच्या आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीवर टीका करणं सुरू केलं आहे. अर्णब यांना रायगड पोलिसांनी अलिबाग कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळत अर्णब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Narayan Rane) यांनी आता या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे.
निलेश राणे म्हणाले, “इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक(Anvay Naik) यांनी आईसह आत्महत्या केली हे पटत नाही. त्यामागे पैशांचं कारण असू शकत नाही. 4-6 कोटींसाठी आईसह आत्महत्या का केली असावी ? हा प्रश्न पडतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार अन्वय नाईक यांची संपत्ती 300 कोटींपर्यंत होती. मी तेथील काही लोकांशी चर्चा केली. त्यांनीही ही शंका उपस्थित केली. 300 कोटींची मालमत्ता असलेला मालक आईसोबत का आत्महत्या करतो असा प्रश्न पडतो. चौकशीतून सत्य बाहेर येईल” असंही ते म्हणाले.
स्व. अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत न्हवतं म्हणून अलिबाग मध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली ते करणं पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य बाहेर पडेलंच.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
मराठी माणूस कोरोना काळात बिल भरू शकला नाही म्हणून किती मराठी माणसांना जीव गमवावे लागले ? लॉकडाऊनमध्ये लाखो मराठी तरूण बेरोजगार झाले. मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी 18-19 टक्के झाली. परंतु नेहमीप्रमाणे सोयीचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो. परंतु बहुसंख्य मराठी माणसं दिसत नाहीत असा टोलाही निलेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मराठी माणूस कोरोना आजारा मूळे बिल भरू शकला नाही म्हणून किती मराठी माणसांना जीव गमवावे लागले? लॉकडाऊन मध्ये लाखो मराठी तरुण बेरोजगार झाले, मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८/१९ % झाली, पण नेहमीप्रमाणे सोईचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो पण बहुसंख्य मराठी माणसं दिसत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
नेमकं प्रकरण काय ?
कॉनकॉर्ड डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमूद यांनी 2018 मध्ये रायगड मध्ये आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. या तिघांनी आपले 5.40 कोटी रुपये थकवल्याचं अन्वय यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.