बहुजननामा ऑनलाईन- देशभरात 13 सप्टेंबर रोजी जवळपास 3,843 परीक्षा केंद्रांवर NEET परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी देशभरातील जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती. कोरोनाच्या संकटात देखील इतक्या मोट्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पण काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नव्हती. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांची परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. त्यानंतर देशातील नीट परीक्षेचा संपूर्ण निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
देशभरातून जवळपास 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. यामधील ९० टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यानंतर आज या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. परंतु आज हा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. परंतु सरकारने आता हळूहळू सर्व उघडण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये निटच्या परीक्षेचा निर्णय देखील घेण्यात आला आणि अखेर हि परीक्षा पार पडली देखील. पण 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. मात्र, लाखो विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. आता, या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता, नीट मैदानात उतरणे फायदेशीर ठरेल.
दरम्यान, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नीट परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली होती. या परीक्षेच्या निकालाला उशीर होऊ शकतो असे त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर नॅशनल टेस्टिंग एजन्स च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेचा निकाल हा 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाऊ शकतो. असेही म्हटलं होतं. परंतु आता हा निकाल १६ ऑक्टोबरला लागणार आहे.