नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता आंध्र प्रदेश सरकारने कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणार्यांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली.
कोणत्याही हॉस्पिटलने कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देऊ नये. असे आढळल्यास त्या हॉस्पिटलविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिला. त्याशिवाय कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची विटंबना टाळण्यासाठी आता संबंधितांवर अंत्यसंस्कार करणार्यांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकार्यांना त्याबाबतचा आदेश लवकर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपायांची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक क्वारंटाइन सेंटरने तक्रारींसाठी कॉल सेंटरचा नंबर रुग्णांना द्यावा आणि अधिकार्यांनी त्याद्वारे नियमितपणे अभिप्राय घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले.