नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिमला येथे सभेला संबोधित केले. या वेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आणि राहुल गांधी यांना या विषयावर चर्चा करण्याचे आव्हान दिले. CAA बाबत अमित शहा यांनी मेळाव्यात सांगितले की, अल्पसंख्याकांवर छळ होत असलेल्या पाकिस्तानने नेहरू-लियाकत करार पाळला नाही. पाकिस्तानातून कोट्यवधी लोक येथे आले होते, परंतु त्यांना नागरिकत्व मिळाले नाही.
आमच्या सरकारने CAA आणले आहे, कांग्रेस अँड कंपनी अशी अफवा पसरवित आहे की यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाईल. अमित शहा म्हणाले की मी राहुल बाबांना आव्हान देतो, जर कोणाचे नागरिकत्व घेण्याची तरतूद असेल तर सांगा, या कायद्याने कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. दरम्यान, सीएएच्या मुद्यावर कॉंग्रेस पक्ष सतत मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. या कायद्याच्या माध्यमातून सरकार धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू इच्छित असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
मोदी सरकारने हिमाचलसाठी केले काम :
अमित शहा म्हणाले की, हिमाचल प्रदेशच्या भूमीवरील तरुणांनी भारतासाठी आपले प्राण दिले आणि देशाची सेवा केली. ते म्हणाले की, चार परमवीर चक्र फक्त येथील सैनिकांनाच मिळाले आहेत. भाजपा दरवर्षी आपल्या कामाचा लेखाजोखा देते, असा लेखाजोखा देण्याची कोणत्याही पक्षाची हिम्मत होऊ शकत नाही. आज हिमाचलच्या सर्व महिलांना गॅस सिलेंडर मिळत आहेत, मोदींनी गरिबीत काढलेले आपले बालपण लक्षात ठेवून ही योजना बनवली होती. आज मोदी सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील गरीब लोक स्वस्त उपचार घेत आहेत.
‘हे मौनी बाबा नाही तर ५६ इंच छाती असणारे मोदी आहेत’ :
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, अशी काही कामे आहेत जी फक्त मोदी जी करू शकतात, आमच्या सरकारने सैनिकांच्या OROP ची मागणी पूर्ण केली. कॉंग्रेसचे सरकार दहा वर्षे चालले, पाकिस्तानमधून दररोज आलिया-मालिया-जमालिया भारतात शिरत होते आणि शिरच्छेद करायचे पण पंतप्रधानांचे तोंडून शब्द बाहेर येत नव्हता. पण जेव्हा मोदी जी पंतप्रधान झाले, तेव्हा पाकिस्तानला जोरदार उत्तर मिळाले, ते मौनी बाबा नव्हते, तर ते ५६ इंच छाती असणारे मोदीजी आहेत.
शाह यांनी पाकिस्तानच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली :
या मेळाव्यात अमित शहा म्हणाले की, पाकिस्तानने उरी, पुलवामा येथे हल्ला केला, परंतु १० दिवसातच मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक-हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते म्हणाले की जेव्हा मी १३ वर्षांचा होतो तेव्हापासून मी ‘एक देश एक विधान’ असे नारे लगावत होतो, ५५ वर्षापर्यंत काहीही झाले नाही परंतु मोदींनी एका झटक्यात जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० काढून टाकले. अमित शहा म्हणाले की, रामजन्मभूमी वादात कॉंग्रेस सातत्याने अडवणूक करण्याची भूमिका घेत होते, पण आता अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
Visit : bahujannama.com