नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारला ऐकवले आहे. ‘मोदी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी यंगिस्तान मैदानात टिकून राहील, असे प्रियंका गांधी म्हणाल्या आहते. प्रियंका गांधी यांनी ट्विटरद्वारे कालगणना समजून घ्यायचे आवाहन केले आहे. पुढे त्यांनी ट्विट करत ते तुम्हाला २ कोटी नोकऱ्यांचे वचन देतील. मग सरकार स्थापन करतील. मग विद्यापीठं उद्धवस्त करतील. नंतर देशाची घटना नष्ट करतील. नंतर तुम्ही निषेध केल्यावर ते तुम्हाला ‘फूल’ म्हणतील. पण एवढे सगळे झाल्यावरही या देशातील तरुण मैदानात उभा असेल, असेही त्या म्हणाल्या.
https://twitter.com/priyankagandhi/status/1210449226762600449
हा देश एक सामायिक स्वप्न आणि संबंध आहे. या मातीला आपण कष्टाच्या रंगाने रंगवले आहे. राज्यघटना ही आपली शक्ती आहे. देशात फूट पाडा आणि देशाला राजकारणापासून वाचवायचे आहे, असे सांगा. असे ट्विट प्रियांका गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी केले.
ये देश एक साझा रिश्ता है, साझा ख़्वाब है। इस मिट्टी को हमने मेहनतों के रंग से सींचा है। संविधान हमारी शक्ति है।
देश को फूट डालो और राज करो की राजनीति से बचाना है। आइए आज दोपहर 3 बजे से बापू की समाधि राजघाट पर मेरे साथ संविधान पाठ का हिस्सा बनिए।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 23, 2019
सीएएचा निषेध करणाऱ्यांवर युपी पोलिसांनी कारवाई केल्यामुळे प्रियांका यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी योगी सरकारलाही सुनावले आहे. प्रियांका गांधी यावेळी होणाऱ्या काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Visit : bahujannama.com