बहुजननामा ऑनलाईन टीम : बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तान एलओसीवर अनेक डावपेच साधत आहे. एका नवीन कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानने एलओसीजवळ राहणाऱ्या लोकांसाठी ‘एहसास कार्यक्रम’ होणार असल्याची घोषणा केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे विशेष सल्लागार डॉ. फिरदौस आशिक अवान यांनी सांगितले की, संघाचे मंत्रिमंडळ एलओसीजवळ राहणाऱ्या कुटुंबांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. जिच्याद्वारे एलओसीजवळ राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील विवाहित महिलेला दर तीन महिन्याने पाच हजार रुपये दिले जातील.
ही प्रक्रिया वर्षातून चार वेळा केली जाईल, अशी एक योजना या पॅकेजमध्ये आहे. आयएनएसच्या रिपोर्टनुसार अवान यांनी ट्विट केले आहे की, एलओसीजवळ राहणारे लोक धाडसी असून ते मातृभूमीसाठी सशस्त्र सेनेसोबत शत्रूचा सामना करत आहेत. त्यांच्या बलिदानाला आम्ही सलाम करतो.
Visit : bahujannama.com